मुंबई : अभिनेता  कुशल बद्रिके  'चला हवा येऊ द्या' या शोमुळे घराघरात पोहोचला. कुशल आपल्या अभिनयाने कायमच सर्वांना आनंद देत असतो.  कुशल कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो.  आपण प्रेक्षकांनी कुशल बद्रिकेचा आतापर्यंत प्रवास पाहिला आहे. त्याचप्रमाणे त्याला कुटुंबियांकडून मिळणारी साथ अतिशय खंबीर आहे.दरवेळी कुशल त्याच्या मनातील भावना चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करतो. यावेळी देखील कुशलने एक पोस्ट शेअर केली आहे. जी पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.  तो आपल्या चाहत्यांसोबत नेहमी पोस्ट शेअर करत असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कायम सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही दिवसांपुर्वी एक पोस्ट शेअर केली होती जी पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, कुशल नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर अशा पोस्ट शेअर करत असतो. कुशलला लिखाणाची खूप आवड आहे आणि तो त्याच्या सोशल मीडियावर कायम लिहीता होत असतो.  ही पोस्ट शेअर करत कुशलने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''आयुष्य आणि आयुष्यातली माणसं… ज्यांच्या डोळ्यांमध्ये कधीतरी आपण स्वतःसाठीची हुरहूर पाहिली, आपल्यासाठी आनंदाने भरुन आलेलं आभाळ आणि दुःखाने ओलावलेल्या कडा पहिल्या.त्यांच्याच डोळ्यात आपल्यासाठीचे अनोळखी भाव पाहिलेत का कधी ? की जणू आपण ह्या व्यक्तीला ओळखतंच नाही… हे अनोळखीपण फार जीवघेण असतं यार ! आणि कधीकधी हे अनोळखीपण आपल्या स्वतःसाठी, “स्वतःच्याच” नजरेत उतरत.'' 



त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. याचबरोबर कुशलने एक स्वत:चा ब्लॅक अँण्ड व्हाईट एक फोटोही शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या पोस्टवर लाईक कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, Camera फारच सुधारला आहे का? तर अजून एकाने लिहीलंय, सहज स्क्रीन स्क्रोल down केली आणि सर तुमचा फोटो पाहिला त्यांनतर तुम्ही जे काही caption टाकलं आहे actully सर ते सगळ हा तुमचा फोटो च सांगून जातोय खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर  तर अजून एकाने लिहीलंय, सुनयना वहिनी - हल्ली कॅमेरा खूप बरे यायला लागले आहेत.. तर अजून एकाने म्हटलंय, Totally relate this day's, कधी कधी ना माणसं कशी ओळखायची हे समजायला बराच वेळ लागतो तसं म्हणायचं झालं तर ना आपली माणसं वगळता ज्यांच्याशी आपला एक वेगळ्या प्रकारचा bond तयार होतो तोही घट्ट असतो पण कालांतराने तीही दूरावतात. मग ओळखीच्या लोकांची तर गोष्ट निराळी. अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स सध्या चाहते अभनेत्याच्या पोस्टवर करत आहेत.