मुंबई : 'दिया और बाती हम' या एकेकाळच्या लोकप्रिय मालिकेतील सूरज राठी तुमच्या लक्षात असेलच... सूरजची भूमिका निभावली होती अभिनेता अनस राशिद यानं... आज सूरज मात्र छोट्या पडद्यावरून गायब झालाय... कुठे आहे तो, काय करतो सध्या? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेले असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या दोन वर्षांपासून राशिद गायब आहे... तो सध्या चंदीगडच्या मालेरकोटलामध्ये आपल्या कुटुंबीयांसोबत तो स्थायिक झालाय. एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या अनसनं आता मात्र अभिनयाचा नाद सोडलाय... आणि आपल्या गावी मालेरकोटलामध्ये तो चक्क शेती करतोय. 



अनसनं 'दिया और बाती हम'मध्ये एका अशिक्षित मिठाईवाल्याची भूमिका निभावली होती. पाच वर्ष अभिनय केल्यानंतर आता आपण ब्रेक घेतलाय. हा ब्रेक किती काळापर्यंत सुरू राहील हे सांगता येणार नाही... परंतु, या निर्णयामुळे माझे कुटुंबीय आनंदात आहेत. आता मी जास्तीत जास्त वेळ माझ्या कुटुंबासोबत असतो, असं अनस म्हणतो. 


अभिनयात पदार्पण करण्यापूर्वीही मी शेती करत होतो... शेतात ट्रॅक्टर चालवणं मला आवडतं, असं अनसनं म्हटलंय. 


गेल्या वर्षीही अनस चर्चेत आला होता तो त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या मुलीसोबत विवाह केल्यामुळे... गेल्या सप्टेंबरमध्ये अनसनं १४ वर्षांनी लहान असलेल्या इकबाल हिच्यासोबत विवाह केला होता.