Dil Chahta Hai: अभिनेता फरहान अख्तर हा त्याच्या अभिनय कौशल्यासोबतच दिग्दर्शनासाठीही ओळखला जातो. आजच्या तरुणाईला साजेसे, पटणारे आणि झेपणारे चित्रपट साकारण्यासाठी फरहान ओळखला जातो. संवेदनशील विषयांना परिणामकारकपणे मांडणं हे त्याचं वैशिष्ट्य. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फरहानच्याच दिग्दर्शनात साकारलेल्या Dil Chahta Hai या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं चित्रपटातील कलाकारांनी आपआपल्या परिनं चाहत्यांचे आभार मानले आहेत. खुद्द फरहान अख्तरनेही या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे आभार मानले. यावेळी त्यानं, 'तारा' ही भूमिका साकारणाऱ्या डिंपल कपाडिया यांच्याबद्दल एक मोठं वक्तव्य केलं. 


हे खरंय; ९ वर्षांनंतर सोनमच्या जीवनातील 'ती' गोष्ट अखेर समोर आलीच 


 


चित्रपटात डिंपल यांनी साकारलेली भूमिका बोल्ड आणि चौकटी मोडणारी होती. आपल्याहून कमी वयातील मुलावर प्रेमात पडणारी एक महिला त्यांनी साकारली होती. त्यामुळं या भूमिकेला न्याय देणाऱ्या डिंपल यांचे आभार मानत फरहाननं लिहिलं, 'माझ्य़ा मते तुम्ही चित्रपट नाकारला असता, तर मी तो बंदच केला असता. 'तारा' हे पात्र तुमच्यासाठीच लिहिलं गेलं होतं आणि माझं नशीब चांगलं की तुम्ही त्यासाठी तयार झालात.'




अतिशय गाजलेल्या अशा Dil Chahta Hai ला 20 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्तानं फरहाननं एक महत्त्वाची घोषणाही केली. त्याचा आगामी चित्रपट हा एका रोड ट्रीपवर अवलंबून असून, त्यामध्ये प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट झळकणार आहेत. त्यामुळं हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमधडाका करु शकतो.