Saili Sanjeev  : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव आणि चेन्नई सुपर किंग्सचा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्या नात्याबाबतच्या चर्चा सातत्याने समोर येत असतात. काहे दिया परदेस मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या सायली संजीवने मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावलं आहे. दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडबरोबर तिचं नाव सातत्याने जोडलं जात आहे. दोघेजण रिलेशनशीपमध्ये अनेक एकमेकांना डेट करत असल्याचे वारंवारं म्हटलं गेलं आहे. मात्र आता एका कार्यक्रमात बोलताना सायली संजीवने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या आयपीयलचा हंगाम सुरु असून चेन्नईकडून खेळणार ऋतुराज गायकवाड चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या आणि सायली संजीवच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी तर सायलीने एक पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून फोटो सोशल मीडियावर टाकला होता तेव्हाही अशीच चर्चा सुरु झाली होती. कारण तिने घातलेला पिवळा रंग आणि चेन्नईच्या जर्सीचा रंग पिळवाच असल्याने सायली ऋतुराजच्या संघाला पाठिंबा देत असल्याचे चाहत्यांनी म्हटलं होतं. त्यावर आता सायली संजीवने स्पष्ट शब्दात आमच्यात फक्त मैत्री होती आणि आता तीसुद्धा उरलेली नाही असे म्हटलं आहे.


आता मैत्रीही राहिली नाही - सायली संजीव


"सगळ्यांना माहिती आहे की आम्ही मित्र आहोत. तरी परत पुन्हा एकदा सांगते की आम्ही चांगले मित्र आहोत. पण सततच्या ट्रोलिंगमुळे आता ही मैत्री देखील राहिलेली नाही. खरंच या ट्रोलिंगचा खूप त्रास झाला आहे. कारण आता आमची मैत्रीही राहिली नाही," असे स्पष्टीकरण सायली संजीवने मुंबई तकच्या एका कार्यक्रमात दिले आहे.


लग्न होईल तेव्हाच चर्चा बंद होतील - सायली संजीव


"मी पिवळ्या ड्रेसवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो माझ्या सिनेमाच्या प्रमोशनचा एक भाग होता. त्यामुळे मी तो फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करताच त्याच्याखाली इतक्या कमेंट आल्या की ते पाहून मला भीतीच वाटली. आता मी पिवळे कपडेच घालणेच बंद केले पाहीजे का? पिवळा रंग रंग आहे, तो मी आधीही घालत होते. आता जेव्हा त्याचे दुसऱ्या कोणाशी लग्न होईल किंवा माझं  दुसऱ्या कोणाशी होईल त्यावेळी या चर्चा बंद होतील," असे  सायली संजीवने म्हटलं आहे.