मुंबई : बॉलीवुड (Bollywood) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनला आजच्या दिवसांत सगळ्यात मोठं स्टार मानलं जातं. तिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये  स्वत:चा ठसा उमटवला आहे. ऐश्वर्या रायने हिंदी चित्रपटांबरोबरच हॉलिवूड चित्रपटांमध्येही तिचं सौंदर्य आणि अभिनय कौशल्य दाखवलं आहे. आज जरी ऐश्वर्या राय हिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत असली तरी  आउटसाइडरमुळे तिला अनेकदा आपल्या हातालते बडे प्रोजेक्ट गमवावे लागल्याची वेळही तिने पाहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चलते-चलते'
या सिनेमात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. या सिनेमासाठी राणीआधी ऐश्वर्या राय बच्चनला या सिनेमात कास्ट करण्यात आलं होतं. ऐश्वर्याने सिनेमासाठी काही सीन्ससाठी शुटिंगही केलं होतं. मात्र एकदम तिच्या जागी राणी मुखर्जीला कास्ट करण्यात आलं. यानंतर ऐश्वर्याच्या हातून हा सिनेमा निसटला. 


'वीर-जारा'
शाहरुख खानची सुपर हिट फिल्म 'वीर-जार'साठी ऐश्वर्या राय ही पहिली पसंती होती. यावेळीदेखील तिच्या आउटसाइडर असल्याने ऐश्वर्याला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यानंतर ऐश्वर्याच्या जागी प्रिती झिंटाला कास्ट करण्यात आलं. (Aishwarya Rai removed from Shah Rukh khan films for being an outsider)


स्वत: ची ओळख स्वत: बनवली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय बच्चनला त्यावेळी जवळपास पाच चित्रपटांसाठी आऊटसर असल्यामुळे काढून टाकण्यात आलं होतं. मात्र, तिने हार मानली नाही आणि स्वबळावर ती बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली.


शाहरुखने मागितली माफी
तुम्हाला सांगतो की, (Shah Rukh Khan) ला  जेव्हा या गोष्टीची जाणीव झाली की, त्याने तिला चुकिची वागणूक दिली तेव्हा त्याने एका मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली होती की, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)च्या जागेवर घेणं राणीला घेणं त्यांची खुप मोठी चूक होती.