Aishwarya Rai On Intimate Scene : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, या सगळ्यात तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत ऐश्वर्यानं तिच्या आणि अभिनेता रणबीर कपूरमध्ये 'ए दिल है मुश्किल' चित्रपटात झालेल्या इंटिमेट सीनविषयी बोलली होती. चला तर जाणून घेऊया नक्की काय म्हणाली होती ऐश्वर्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्यानं ही मुलाखत 2016 मध्ये फिल्मफेअरला दिली होती. यावेळी तिनं स्वत: ला मोकळेपणानं बोलणारी आणि हुशार अभिनेत्री म्हटलं होतं. तिनं यावेळी म्हणाली की ती काय करणार याचा अंदाज इतरांना बांधता येऊ नये आणि ती एक मुक्त अभिनेत्री आहे पण याचा अर्थ असा नाही की तिच्यावर प्रतिबंध लागू करता येतील. इंटिमेट सीननं तिच्या आयुष्यावर कसा प्रभाव झाला याविषयी सांगितलं. ऐश्वर्यानं तिचा अनुभव सांगत सांगितलं की मला आधीपासून माहित होतं की माझ्यासोबत कोणताही किसिंग सीन किंवा इंटीमेट सीनला घेऊन वाद होऊ शकतो. हा सीन केवळ एका चित्रपटाचा भाग होता, पण माझ्यासाठी ही मोठी गोष्ट होती. 



तिनं पुढे सांगितलं की 'धूम 2 च्या वेळी जेव्हा तिनं हृतिक रोशनसोबत किसिंग सीन दिला होता, तेव्हा तो सीन खूप चर्चेत होता आणि त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. ऐश्वर्यानं हे स्वीकार केलं की तिला या गोष्टीची कल्पना होती की हा सीन किती संवेदनशील होऊ शकतो, पण तिनं तिची भूमिका आणि पटकथेच्या गरजेनुसार कधीच इंटीमेट सीनला नकार दिला नाही. 


पुढे ऐश्वर्यानं समाज आणि कुटुंबाच्या रिअॅक्शनवर चर्चा केली. तिनं सांगितलं की आपण अशा समाजात राहतो जिथे आपण प्रत्येक क्षणी काय करतो याकडे लक्ष ठेवतात. मला कायम माझ्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या भावनांचा विचार करावा लागतो. ऐश्वर्यानं हे स्पष्ट केलं की हे सगळं कमिटमेंटसाठी खूप महत्त्वाचं असतं. एका कलाकार म्हणून आमची जबाबदारी असते की आम्ही आमच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ. हे कधी-कधी कठीण होतं, पण आम्ही आपली कला आणि कामाला घेऊन प्रामाणिक असणं गरजेचं आहे. 


हेही वाचा : अर्जुन कपूरला डेट करत असल्याची चर्चा असतानाच Insta Queen कुशा कपिलाचं 'ते' उत्तर चर्चेत


ऐश्वर्यानं स्वीकार केला की  मला माहित होतं की याविषयी खूप चर्चा होईल आणि ट्रोलही करण्यात येईल, पण कायम कामाला प्रार्थमिक स्थान दिले आणि त्यांचा सन्मान केला.