मुंबई : लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेट टीमने एक ऐतिहासिक सामना खेळला. अक्षय कुमार रविवारी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये वर्ल्डकपच्या फायनलमध्ये महिला खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचला होता पण त्याच्या हातात जो तिरंगा होता तो उलटा होता. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियातून खूप टीका झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यामध्ये भारतीय संघाला ९ रनने पराभव स्विकारावा लागला. अक्षय कुमार सध्या इंग्लंडमध्ये 'गोल्ड' सिनेमाची शूटिंग करत आहे. फायनल सामन्यात टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी तो मैदानावर आला होता. पण त्याच्या नकळत त्याच्या हातून एक चूक घडली. चूक लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत माफी मागितली.


अक्षयने ट्विट करत म्हटलं की, त्याचा उद्देश्य कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. त्यानंतर त्याने फोटो काढून टाकला.