मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रपटाशिवाय त्यांच्या नात्याच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगत आहे. आता चर्चा होत आहे ती म्हणजे त्यांच्या नव्या गाण्याची. एका चिप्सच्या जाहिरातीच्या गाण्यानं त्यांना अधिक जवळ आणलं आहे. या गाण्यामध्ये त्यांच्या नृत्य अदा चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सुनिधि चौहान व नकाश अजीज यांच्या आवाजात हे गाणं स्वरबद्द करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविषयी रणबीर म्हणतो की, 'कधी आपला मूड फार खराब असतो त्यामुळे आपलं मन रमावं म्हणून प्रत्येक जण गाणं ऐकतो किंवा गुणगुणतो. हे एक असंच गाणं आहे त्यामध्ये पुन्हा कसं रिफ्रेश होवू शकतो हे दाखवण्यात आलं आहे.' गाण्याच्या चित्रीकरणावेळी आम्ही प्रचंड मस्ती केल्याचे त्याने सांगितले. 


रोजच्या धावपळीच्या जीवनात ब्रेकची गरज प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे अशा मस्तीच्या क्षणांमुळे जीवनाला एक नवं वळण मिळतं अशी भावना आलिया भट्टने व्यक्त केली. 


एकिकडे रणबीर आणि आलिया 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ते दोघे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या शिवाय चित्रपटात बॉलिवूडचे महानायक बिग बी देखील झळकणार आहेत.


तर दुसरीकडे, आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा देखील जोर धरत आहेत. तर दोघ सध्या कोणत्याही प्रोजेक्टसाठी होकार देत नसल्याचे समोर येत आहे. तर बॉलिवूडचं हे क्यूट कपल कधी विवाह बंधनात अडकतील याची प्रतिक्षा चाहते करत आहेत.