Amitabh Bachchan KBC : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे सध्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. त्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक म्हणून अमिताभ गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. 15 वा सीझन सुरु असताना आता अमिताभ बच्चन यांनी आता शोला होस्ट करण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये निर्मात्यांकडे मागणी करत सांगितले की त्यांना आता या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक नाही तर मॅरेज कॉन्सिलर ही पोजिशन दिली पाहिजे. कारण या रिअॅलिटी शोमध्ये येणारे जास्त लोक हे त्यांना त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्या सांगताना दिसतात. अमिताभ यांनी यावेळी हे अशासाठी म्हटलं की हॉटसीटवर बसलेल्या एका स्पर्धकानं त्यांना त्याच्या पत्नीच्या संबंधीत एक प्रश्न विचारत त्यावर त्यांना काय वाटतं किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे असे विचारले होते. 



न्यू दिल्लीच्या होममेकर रचना रस्तोगी हॉटसीटवर होत्या आणि त्यांनी अमिताब बच्चन यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील काही समस्या सांगण्यास सुरुवात केली. रचना यांनी हे देखील सांगितलं की त्यांचा पती फ्रीमध्ये या शोमध्ये आला आहे. कारण केबीसीनं त्यांच्या अनेक खर्चाचे पैसे दिले आहेत. रचना या पुढे म्हणाल्या की त्यांचे पती खूप कंजूस आहेत आणि त्यांनी कधीच बाहेर फिरायला घेऊन जात नाही. अमिताभ यांनी त्यांच्या सगळ्या समस्या ऐकल्या आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हटलं की चॅनलच्या लोकांनो या शोमधील त्यांची पोजिशन बदलत सुत्रसंचालका ऐवजी काऊंसिलर बनवलं.  


'हे' आहे केबीसी सोडण्याचं कारण!


अमिताभ बच्चन म्हणाले, 'हे चॅलनच्या लोकांनो माझं नाव अॅंकरच्या ऐवजी मॅरेज काऊंसिलर ठेवा. हिच एक जागा आहे जिथे घरातील सगळं दु:ख इथे येऊन मांडा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथे मिळतील.' त्यानंतर अमिताभ यांनी रचना यांच्या पतीला सल्ला दिला की 'पत्नीवर पैसे खर्च करणं सुरु करा.'  त्यावर त्यांनी आणखी पुढे सांगितलं की 'एक कार्ड घ्या ज्यावर आय लव्ह यू लिहिलेलं असेल आणि हार्ट शेप देखील असेल आणि त्यातून बाण जात असेल. त्या कार्डवर गुलाब देखील असायला हवा.'