नवी दिल्ली : देशभरात होत असलेल्या बलात्काराच्या घटनेवर महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. या घटनांवर भाष्य करण हे खूप भीतीदायक असल्याचे अमिताभ यांनी म्हटले. अमिताभ हे  'बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ' अभियानाचे ब्रांड अॅम्बेसेडर आहेत. एका कार्यक्रमादरम्यान देशभरात सुरू असलेल्या बलात्काराच्या घटनांवर त्यांनी भाष्य केले.  यावेळी अमिताभ यांच्यासोबत ऋषी कपूर उपस्थित होते. जम्मूतील कठुआमध्ये जानेवारीत आठ वर्षाच्या बालिकेवर गॅंगरेप करुन तिची हत्या करण्यात आली. बॉलीवुड कलाकारांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली. अमिताभ यांना जेव्हा यावर प्रतिक्रीया विचारली असता, अशा घटनांवर भाष्य करताना वाईट वाटतं. हे खूप भीतीदायक आहे.



असे प्रश्न मला विचारले जाऊ नये अशी नम्र विनंतीही त्यांनी यावेळी केली.