मुंबई : सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपच्या अनेक बातम्या आजही चर्चेत असल्याचं दिसून येतं. सलमान आणि ऐश्वर्या यांच्या प्रेमकहाणीमध्ये आणखी एका अभिनेत्याचं नाव सर्वात जास्त चर्चेत आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या ब्रेकअपमुळे विवेक ओबेरॉयला मोठा त्रास सहन करावा लागला होता. सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या राय अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं समोर आलं.


या दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चा इंडस्ट्रीत सामान्य झाल्या होत्या. असं बोललं जातं की, सलमान खान याबाबत खूश नव्हता आणि ऐश्वर्यासोबतच्या जवळीकतेमुळे त्याने विवेक ओबेरॉयला धमकी दिली होती.


सलमान खानच्या धमकीनंतर विवेकने जी कारवाई केली, त्याचा फटका अजूनही अभिनेत्याला सहन करावा लागत असल्याचं म्हटलं जात आहे.


सलमान खानच्या धमकीनंतर विवेक ओबेरॉयने पत्रकार परिषद घेऊन सलमान आणि त्याच्यातील संभाषण सार्वजनिक केलेच, पण एकप्रकारे त्याने सलमानला खुले आव्हानही दिले होते. याचाच परिणाम असा झाला की ऐश्वर्याने विवेकसोबतचं नातं संपवलं.


त्याचवेळी सलमान खानसोबतच्या या गोंधळामुळे विवेकला फिल्म इंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले होते. मात्र, या घटनेबाबत दिलेल्या एका मुलाखतीत विवेकनेच सांगितले होते की, त्याला त्याच्या जवळच्या लोकांनी हे करण्यासाठी प्रेरित केले होते.



विवेक या सर्व प्रकरणासाठी ऐश्वर्या रायकडेच बोट करत असल्याचं देखील बोललं जातं. विवेकसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.