मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री, विश्व सुंदरी ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन हे चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय आणि शक्तिशाली कपलपैकी एक मानलं जातात. असं म्हटलं जातं की, ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यातील जवळीकता 'गुरू' चित्रपटादरम्यान वाढली. चित्रपटाच्या सेटपासून सुरू झालेल्या भेटींची मालिका इतकी वाढली की दोघांनीही एकमेकांना आपला जीवनसाथी बनवण्याचा निर्णय घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्टनुसार, जेव्हा अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायसोबत 'गुरू'च्या प्रमोशनसाठी न्यूयॉर्कला गेला होता, तेव्हा त्यांनी ऐश्वर्याला प्रपोज केलं. याबद्दल मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने सांगितलं की, 'जेव्हा अभिषेक मला गुडघे टेकून प्रपोज करत होता, तेव्हा मला हॉलिवूड चित्रपटातील सीन वाटला, मी इतकी आनंदी झाले की, हो म्हणायला मला वेळ लागला नाही.' 


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं 2007 मध्ये लग्न झालं. ऐश्वर्या तिच्या कुटुंबाला विशेष प्राधान्य देते. एका मुलाखतीत अभिषेकने तिच्या हनीमून ट्रिपबद्दल एक अतिशय मजेदार गोष्ट सांगितली होती. अभिनेत्याने सांगितलं की, 'मी ऐश्वर्यासोबत डिस्नेलँडला गेले होते. तिथे ती मला सोडून मिकी आणि मिनीसोबत पोज देत होती. आम्ही खूप मजा केली.


एवढंच नाही तर अभिषेक बच्चनने त्याच्या एनिवर्सरी ट्रिपचा किस्साही सांगितला होता. तो ऐश्वर्यासोबत मालदीवला गेला. तिथे त्यांनी रोमँटिक कँडल डिनरचं नियोजन केलं होतं, मात्र खराब हवामानामुळे यावर देखील पाणी फेरलं गेलं. अभिषेकने सांगितलं की, 'मी मालदीवच्या बीचवर कँडल लाईट डिनर करण्याचा प्रयत्न केला होता. पण वाऱ्यामुळे मेणबत्ती पुन्हा पुन्हा विझत होती. एवढंच नाही तर वारा इतका जोरात होता की जेवणात देखील वाळू येत होती.


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना एक गोड मुलगी आराध्या बच्चन आहे. ऐश्वर्या तिच्या मुलीकडे पूर्ण लक्ष देते, त्यामुळे ती चित्रपटांमध्येही कमी काम करते. मात्र, ती लवकरच मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेलवन' मध्ये दिसणार आहे.