मुंबई : 'भारत' या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भारत'ची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाविषयीच्या प्रत्येक माहितीविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहलाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यातही सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी या चित्रपटातून झळकत असल्यामुळे तर, चित्रपटासोबतच आणखी एका गोष्टीच्या चर्चांना उधाण आलं. अर्थातच त्या चर्चा आहेत...... सलमानच्या लग्नाच्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध कार्यक्रमांमध्ये सलमान आणि कतरिना या चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी हजेरी लावत आहेत. माध्यमांशी संवाद साधत आहेत. प्रत्येक वेळी सलमानला त्याच्या चित्रपटाविषयीच्या प्रश्नांसोबतच खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्नांचाही सामना करावा लागत आहे. या प्रश्नांमध्ये सर्वाधिक विचारला जाणारा एकमेव प्रश्न म्हणजे लग्नाविषयीचाच. 'लग्न कधी करणार.... ?', असा एकच प्रश्न विविध मार्गांनी त्याला विचारण्यात येतो. एकिकडे कलाविश्वातील नवोदित कलाकार विवाहबंधनात अडकत त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत. पण, वयाची पंन्नाशी ओलांडूनही सलमान मात्र बी- टाऊनचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर'च आहे. 


Bharat Movie review : आयुष्याच्या प्रत्येक वळणावर बदलणारा हरफनमौला 'भारत'


असा हा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' लग्नाविषयी नेमका कसा आणि काय विचार करतो, हे एका मुलाखतीतून नुकतच स्पष्ट झालं आहे. 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत भाईजान सलमानने विवाहसंस्थेविषयीचे त्याचे विचार सर्वांसमोर ठेवले. 'माझा लग्नावर विश्वासच नाही. माझ्या मते विवाहसंस्था सध्या मरणासन्न अवस्थेत जात आहे. माझा यावर विश्वासच नाही', असं सलमान म्हणाला. 


मुलाखतीत त्याने विवाहसंस्थेविषयीचे आपले विचार स्पष्ट केले असले तरीही, एका चांगल्या मैत्रीसाठी आणि साथीसाती मात्र त्याने नकार दिला नाही. एकंदरच सलमानचे लग्नाविषयीचे विचार पाहता येत्या काळात तो विवाहबंधनात अडकणार की नाही हा प्रश्नच अनेकांच्या मनात घर करत आहे. पण, तरीही सलमानपुढे येणारे त्याच्या लग्नाचे प्रश्न मात्र कमी होतील की नाही याबाबत मात्र साशंकताच आहे.