मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या रिलेशनशिपमध्ये कधी एकदा नवं वळण येऊन ही मंडळी कधी लग्नाच्या बेडीत अडकतात हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. काही दिवसांपूर्वीच या 'मोस्ट हॅपनिंग' सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. तेव्हापासूनच ज्याप्रमाणे साधारण वर्षभरापूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाच्या चर्चा रंगून अखेर ते विवाहबंधनात अडकल्याची बातमी आली होती, त्याचप्रमाणे आलिया आणि रणबीरच्या लग्नाविषयीसुद्धा तर्कवितर्क लावले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात व्हायरल होणारी लग्नपत्रिका ही खोटी असल्याचं जरी अधिकृतपणे सांगण्यात आलं असलं तरीही आता नोव्हेंबर महिन्यात ही मंडळी लग्न करणार असल्याचं कळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा बहुप्रतिक्षित विवाहसोहळा ८, ९, १० नोव्हेंबर या दिवसांमध्ये पार पडणार असल्याची चिन्हं आहेत. 


रणबीर- आलियाचं लग्न म्हटलं की उत्सुकता ही आलीच. विविध कारणांनी ही जोडी कायमच इतरांना 'कपल गोल्स' देऊ लागली आहे. त्यातच आता इतर सेलिब्रिटींच्या पावलावर पाऊल ठेवत  आलिया आणि रणबीरनेही डेस्टिनेशन वेडिंगला पसंती दिल्याचं कळत आहे. 
या गोष्टींमुळे खास ठरु शकतो त्यांचा विवाहसोहळा


- विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नसोहळ्यामध्ये पाहुण्यांना मेजवानी देण्याची जबाबदारी घेतलेल्या सेलिब्रिटी शेफ रितू दालमिया यांच्याकडे रणबीर- आलियाच्या लग्नसोहळ्याचीही जबाबदारी असेल. 


- गेल्या काही दिवसांपासून खुद्द रणबीरही सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याच्याकडे जात असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळे ही सारी ये- जा लग्नसोहळ्याच्या दिवसासाठीच असल्याचं कळत आहे. 



बी- टाऊनचा सावरिया, रणबीर आणि त्याची प्रेयसी आलिया भट्ट यांच्या लग्नसोहळ्याच्या अधिकृत घोषणेविषयीच आता सर्वांना प्रतिक्षा लागून राहिलेली आहे.