मुंबई: तनुश्री- नाना वादाला रोज नवी वळणं मिळत असतानाच असतानाच आता हिंदी कलाविश्वातीच अशा काही घटना समोर येत आहेत, ज्यामुळे अनेकांना धक्काच बसत आहे. बी- टाऊनची 'क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिनेसुद्धा दिग्दर्शक विकास बहलवर काही आरोप केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाच्या या आरोपांनंतर फॅशनिस्टा सोनम कपूर हिने कंगनाच्या वक्तव्याकडे गांभीर्याने पाहणं तसं कठीणच असल्याचं म्हणत या मुद्द्यावर आपलं मत मांडलं. 


अर्थातच जर कंगनाने खरंच अशा प्रसंगाचा सामना केला असेल तर समोरच्या दोषी व्यक्तीला त्याची शिक्षा व्हावी असंही तिने म्हटलं. 


एका कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य करणं सोनमला आता महागात पडताना दिसत आहे. 



खुद्द कंगनानेच आता तिच्या या वक्तव्याला निशाणा करत तिखट शब्दांमध्ये सोनमला सुनावलं आहे. 'पिंकवव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सोनमवर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. 


'माझ्या म्हणण्याकडे गांभीर्याने पाहणं कठीण असं ती म्हणूच कशी शकते? जेव्हा मी आपल्यासोबत घडलेला एक दुर्दैवी प्रसंग सर्वांसमोर माडंत आहे त्यावर तिला प्रतिक्रिया देण्याचा हक्क दिला कोणी? तिच्याकडे या साऱ्याचा परवाना आहे का ? माझ्या वक्तव्यामुळे तिला इतकं अडचणीत आल्यासारखं का वाटतंय?', अशा शब्दामध्ये तिने सोनमला सुनावलं. 


आपणही आंतरराष्ट्रीय पातळीवर बारताचं प्रतिनिधीत्वं केलं आहे. वडिलांच्याच नावावरुन आपली ओळख नाही, तर दहा वर्षांच्या संघर्षानंतर मला ही जागा मिळाली आहे, असं म्हणत तिने आपलं मत मांडलं. 


एक अभिनेत्री म्हणून आणि एक वक्ती म्हणमही सोनमची चांगली प्रतिमा नसल्याचं म्हणत कंगनाने नव्या वादाला तोंड फोडलं आहे. या फिल्मी लोकांना आपल्याविषयी बोलण्याचा हक्क दिलाच कोणी असा प्रश्न उपस्थित करत त्यांना नष्ट करण्याचा इशारा या 'क्वीन'ने दिला. 


कंगनाचं हे वक्तव्य पाहता आता येत्या काळात चित्रपट विश्वात सोनम विरुद्ध कंगना यांच्यातला वाद कोणत्या नव्या वळणावर जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.