मुंबई : काही दिवसांपूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या कपूर कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. अभिनेता रणबीर कपूर यानं आलिया भट्टशी लग्नगाठ बांधत एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. यावेळी कुटुंबातील सर्व व्यक्तींना कमाल आनंद झाला होता. सर्वाधिक आनंदी कोण दिसलं तर ती होती रणबीरची आई, अभिनेत्री नीतू कपूर. (Alia bhatt ranbir kapoor)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच नीतू कपूर आज अचानकच भावूक झाल्या. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. कारण, होतं ऋषी कपूर यांची त्यांच्या आयुष्यात असणारी अनुपस्थिती. 


नीतू कपूर यांनी पतीच्या दुसऱ्या स्मृतीदिनी एक भावूक पोस्ट लिहित, जोडीदाराची साथ नसताना परिस्थिती कशी असते, यावर वक्तव्य केलं. (Neetu Kapoor )


'आज ऋषीजी आपल्याला सोडून गेल्याला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. 45 वर्षांपासून साथ देणारा जोडीदार गमावणं फारच वेदनादायी असतं. अशा वेळी मानसिकरित्या स्वत:ला गुंतवून ठेवणं हा यातून सावरण्याचा एकच मार्ग ठरतो', असं लिहित चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वानं मला यात मदत केली हेसुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. 


ऋषी कपूर यांची आठवण कायमच येत राहील, असं लिहित नीतू कपूर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. हिंदी कलाजगतामध्ये प्रचंड लोकप्रिय आणि #CoupleGoals देणाऱ्या जोड्यांमध्ये कायमच या दिग्गज जोडीला गणलं गेलं. 



आजही ऋषी आणि नीतू यांची तितकीच लोकप्रियता असून, नीतू आणि कपूर कुटुंबीयांच्या माध्यमातून कमीजास्त प्रमाणात प्रेक्षकही नकळतच ऋषी यांची भेट घेताना दिसतात.