मुंबई : 'केदारनाथ' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आणि हिंदी चित्रपट विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या मनमिळाऊ स्वभावामुळेही प्रकाशझोतात असते. पदार्पणाच्या चित्रपटातच साराने तिची अशी वेगळी छाप चाहत्यांच्या मनावर उमटवली. ज्यानंतर तिने कायमनच विविध कार्यक्रमादरम्यान आपल्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं. एक अभिनेत्री म्हणून सारावरही अपेक्षितपणे माध्यमांच्या सतत नजरा असतात. याविषयीच तिने आता तिचं मत उघड केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा अनेकदा माध्यमांच्या नजरा आपला वारंवार पाठलाग करत असल्याचं पाहून सेलिब्रिटी नाराजी व्यक्त करतात, माध्यमांना टाळतातही. पण, सारा मात्र याला बऱ्याचदा अपवाद ठरते. जीम म्हणू नका, किंवा एखाद्या ठिकाणाला भेट देणं म्हणू नका. साराला पाहिल्यावर जेव्हा माध्यमांचे प्रतिनिधी, विशेषत: छायाचित्रकार तिच्याभोवती गऱ्हाडा घालतात. तेव्हा तीसुद्धा त्यांना आनंदी चेहऱ्याने भेटते. याच बाबतीत तिने एक अत्यंत महतत्वाचा दृष्चटीकोन सर्वांसमोर ठेवला आहे. 


'मिस  मालिनी' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत तिने एक अत्यंच महत्त्वाची बाब सांगितली. 'छायाचित्रकार तुमचा एक फोटो टीपण्यासाठी उभे असतात ही एक बाजू. आता याच्याच विरुद्ध विचार करुन पाहा. म्हणजे तुम्ही जीममधून बाहेर येता. तिथे सात छायाचित्रकार उभे आहेत. पण, ते तुमचा फोटोच काढत नाही आहेत. किंवा, २० माणसं तिथे आहेत. पण, ते तुमच्यासोबत सेल्फीही काढत नाहीत. आता जेव्हा ते छायाचित्रकार तुमचा फोटोच काढच नाहीत तेव्हा ही बाब धास्तावणारी असते. ज्याविषयी सहाजिकच चिंता वाटू लागते. तुमच्यासाठी ही बाब अडचणीचीही ठरु शकते.', असं सारा म्हणाली. 


विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ



जवळपास एक वर्षाहून अधिक काळ या चित्रपटसृष्टीत व्यतीत केल्यानंतर अगदी थोड्या वेळात इतकी प्रसिद्धी, आपलेपणा मिळणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं असल्याचं सांगत याची तुलना दुसऱ्या कोणत्याच गोष्टीशी होऊ शकत नसल्याचं मतही तिने मांडलं. माध्यमांशी असणारं हेच सुरेख नातं अगदी शिताफीने हाताळण्याच्या याच गुणामुळेही सारा सर्वांच्याच आवडीची अभिनेत्री ठरत आहे.