मुंबई : प्रेमाचं नातं बहरु लागलं की त्याची माहिती सर्वांनाच होते. मुळात प्रेम ही एक अशी भावना आहे जी प्रयत्न करुनही लपवता येत नाही. तुम्हीआम्हीही हे अनुभवलं असेल मग सेलिब्रिटींचं काय घेऊन बसलात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या काही दिवसांपासून अशीच एक सेलिब्रिटी जोडी प्रचंड चर्चेत आली आहे. निमित्तं ठरतंय ते म्हणजे एका रिअॅलिटी शोपासून सुरु झालेली त्यांची प्रेमकहाणी. 


ही सेलिब्रिटी जोडी आहे अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री शमिता शेट्टी यांची. शमिता आणि राकेश एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की, पाहणाऱ्यांनाही या जोडीचं कुतूहल वाटू लागलं. 


अनेकांनी तर ही जोडी लग्नबंधनात केव्हा अडकणार असे प्रश्नही विचारण्यास सुरुवात केली. पण, याच प्रश्नांची उत्तरं मिळण्याऐवजी एक धक्कादायक माहिती समोर आली. 


ही माहिती म्हणजे राकेश आणि शमितामध्ये आलेल्या दुराव्याची. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून शमिता आणि राकेशमध्ये बरेच मतभेद झाले. 



परिणामी त्यांनी आपल्या वाटा वेगळ्या करण्याचा निर्णय घेतला. दोघांचीही विचारसरणी वेगळी असल्यामुळं एकमत होत नसल्यानंच या दोघांनीही वेगळं व्हायचं ठरवलं आहे, असं कळत आहे. 


अद्यापही शमिता किंवा राकेशनं याबाबतचा कोणताही खुलासा केलेला नाही. पण, जर त्यांच्या नात्यात खरंच दुरावा आला असल्यास चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असेल असं म्हणायला हरकत नाही.