मुंबई - फेब्रुवारी महिन्यात येणारा 'वेलेंटाइन विक' सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. खरंतर या प्रेमाबद्दल अधिकतर आपल्याला बॉलिवूडनेच शिकवलं. बॉलिवूडच्या काही जोड्या पडद्यावर 'रिल लाईफ'मध्ये नाही तर 'रिअल लाईफ'मध्येही तितक्याच यशस्वी आहेत. बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते, अभिनेत्रींमध्ये घटस्फोटाच्या घटनांची चर्चा आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडच्या काही जोड्या त्यांच्या नात्यांमध्ये पूर्णपणे यशस्वी झाल्या आहेत. बॉलिवूडमधील अनेक जोड्यांचा रिअल प्रवास थक्क करणारा आहे. जाणून घेऊया अशा काही स्पेशल 'वेलेंटाईन'बाबत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन - जया बच्चन


अमिताभ आणि जया बच्चन यांचं लग्न जवळपास ४५ वर्षांपूर्वी झालं. ही जोडी बॉलिवूडमधील एक पॉवर कपल म्हणून ओळखली जाते. जया आणि अमिताभ यांची ओळख ऋषीकेश मुखर्जी यांनी त्यांच्या 'गुड्डी' सेटवर करून दिली होती. त्यानंतर १९७३ साली अमिताभ आणि जया बच्चन यांनी एकत्र 'जंजीर' चित्रपटात काम केलं. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.



दिलीप कुमार - सायरा बानो


दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या जोडीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. या दोघांच्या ५२ वर्षांच्या साथीने इंडस्ट्रीमध्ये आदर्श निर्माण केला आहे. दिलीप कुमार यांनी चाहती असलेल्या सायरा बानो यांनी २२ व्या वर्षी ४४ वर्षांच्या दिलीप कुमारसह लग्न केलं होतं.



शाहरूख खान - गौरी खान


बॉलिवूडचा रोमान्सचा बादशाह किंग खान खऱ्या आयुष्यातही तितकाच रोमॅन्टिक आहे. गौरी आणि शाहरूखच्या लग्नाला जवळपास २८ वर्षे झाली असून अजूनही दोघांच्या प्रेमात कोणतीच कमी आली नाही. बॉलिवूडमध्ये शाहरूख-गौरी ही जोडी सगळ्याच कपल्ससाठी एक आदर्श उदाहरण आहे. शाहरूख आणि गौरीला आर्यन, सुहाना आणि अबराम ही तीन मुलं आहेत.



ऋषी कपूर - नितू कपूर


३८ वर्ष एकमेकांसोबत राहणारे ऋषी कपूर आणि नितू कपूर यांनी सर्वांसमोर कपल गोल्स ठेवलं आहे. या दोघांनी हिंदी चित्रपटासाठी मोठं योगदान दिलं आहे. बॉलिवूडचं रोमॅन्टिक कपल म्हणून ओळखली जाणारी ही जोडी सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये ईलाज करत असून नितू कपूर त्यांच्या प्रत्येक अडथळ्यात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. रिद्धिमा कपूर आणि रणबीर कपूर ऋषी आणि नितू कपूर यांची मुलं आहेत.



अजय देवगण - काजोल


अजय आणि काजोल हे दोघेही अतिशय भिन्न स्वभावाचे आहेत. काजोल अतिशय फन लविंग व्यक्ती आहे तर अजय शांत स्वभावाचा आहे. या दोघांच्या लग्नाला जवळपास २० वर्ष पूर्ण झाली आहेत. एकत्र राहण्यासाठी दोन लोक एकसारखेच असणं गरजेच नाही हेच या दोघांनी पटवून दिलं आहे.



अभिषेक बच्चन - ऐश्वर्या राय-बच्चन


अभिषेक आणि ऐश्वर्याने लग्नाची १२ वर्षे पूर्ण केली आहेत. २००७ साली 'गुरू' चित्रपटाच्या सेटवर दोघे एकत्र आले आणि तेव्हापासूनच त्यांची लव्हस्टोरी सुरू झाली. 'गुरू'च्या सक्सेस पार्टीवेळी अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी विचारले होते. त्यानंतर २० एप्रिल २००७ साली दोघांनी लग्न केलं. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे.



अक्षय कुमार - ट्विंकल खन्ना 


ट्विंकल खन्नाच्या 'मेला' चित्रपटानंतर लगेचच अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केलं होतं. २००१ मध्ये हे दोघे लग्नबंधनात उडकले. दोघांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली. सोशल मीडियावरून दोघेही त्यांचे फोटोज् शेअर करत त्यांचे एकमेकांप्रती असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. अक्षय आणि ट्विंकलला आरव आणि नितारा ही दोन मुलं आहेत.