मुंबई : बॉलिवूडमध्ये खूप कमी असे कपल आहेत ज्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमेस्ट्री अतिशय शानदार आहे. या प्रकरणात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh)  यांचं नाव अग्रस्थानी आहे. कारण चाहते या दोघांना जेवढे पडद्यावर पसंत करतात तेवढेच खऱ्या आयुष्यातही पसंत करतात. रणवीर आणि दीपिका आज एक कपल म्हणून ओळखले जातात. मात्र यांच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीतून झाली होती. रणवीर आणि दीपिका एकमेकांना गेल्या ८ वर्षांपासून ओळखत आहे. मात्र दीपिकाच्या म्हणण्यानुसार रणवीर आणि ती एकमेकांना अजूनही निटसे ओळखत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर आणि दीपिका यांची मुलाखत २०१३ साली 'गोलियां की रास लीला राम-लीला' या सिनेमात झाली. संजय लीला भन्साळीच्या या सिनेमात रणवीर रामचं कॅरेक्टर प्ले करत आहे तर दीपिका लीलाचं कॅरेक्टर प्ले करत आहे. सिनेमाच्या कथेसोबतच रणवीर आणि दीपिकाची केमिस्ट्री देखील प्रेक्षकांना पसंत आली. यानंतर या दोघांनी अनेक हिट सिनेमे दिले आहेत. २०१८ साली या दोघांनी लग्न केलं आहे. 


लग्नानंतर प्रत्येक कपलला भीती असते की, त्यांच्या नात्यातील सस्पेंस ऍक्ट्रॅक्शन संपणार तर नाही ना. मात्र दीपिका म्हणते की, ती रणवीरला प्रत्येक दिवशी नव्याने ओळखत असते. एवढंच नाही तर रणवीर देखील तिला पूर्णपणे ओळखू शकला नाही. 



दीपिका पुढे सांगते की, रणवीर तिला यासाठी आवडला कारण एवढे वर्ष ओळखूनही मला त्याच्याबद्दल अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दीपिका म्हणते की, 'माझी आणि रणवीरच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीतून झाली होती. मैत्रीत असताना एका टप्प्यात आम्हाला एकमेकांबद्दल वेगळं जाणवलं. आम्ही एकमेकांपासून अगदी वेगळे आहोत. मला आजही वाटतं मला रणवीरबद्दल सगळ्या गोष्टी माहिती नाहीत.'