मुंबई: 'संस्कारी बाबुजी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते आलोकनाथ याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर अनेकांच्याच भुवया उंचावल्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आलोकनाथ यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचं म्हणत विनता नंदा यांनी त्यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून काही गंभीर आरोप केले होते. ज्या आरोपानंतर विनता आणि आलोकनाथ यांच्यामध्ये असणांरं हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र कायद्यापर्यंतही पोहोचलं. 


'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार आलोनाथ आणि त्यांच्या पत्नीने विनता यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. इतकच नव्हे तर, बाबुजींची पत्नी आशु सिंह यांनी विनता यांच्याकडून नुकसान भरपाई म्हणून अवघा एक रुपया मागितला आहे. 


नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम न मागता अवघ्या एका रुपयावरच हे प्रकरण शांत करण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून पाहायला मिळत आहे. 


आलोकनाथ यांचे वकील अशोक सरोगी  यांच्यानुसार विनता यांच्या आरोपांनतर समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. 


कुठेही बाहेर निघालं असता अनेकजण त्यांच्याकडे आरोपी म्हणून पाहात आहेत, अशी खंत त्यांच्या पत्नीने व्यक्त केली आहे. 


सदर प्रकरणी पोलीस तपास करण्यात यावा अशी मागणी करण्याची विचारणा करण्यालाठी आलोकनाथ यांच्याकडून न्यायालयाची मदत घेण्यात आल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे कोणता निर्णय दिला जातो, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.