मुंबई : शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर हे तिन्ही स्टारचं एकत्र नाव घेतलं की, एकच चित्रपट लोकांच्या समोर येतो तो म्हणजे 'दिल तो पागल है'. हा चित्रपट लोकांना आजही तितकाच आवडला आहे जितका तो रिलिज झाल्यानंतर आवडला होता. यश चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट त्यावेळेचा सर्वात हिट आणि बहुचर्चीत चित्रपट ठरला. या चित्रपटात दोन अभिनेत्रींनी एकत्र काम केले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इंडस्ट्रीतील कोणतीही नायिका या चित्रपटात निशाची भूमिका साकारण्यास तयार नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिश्मानेही या भूमिकेसाठी यापूर्वी नाही म्हटले होते. पण इतक्या मोठ्या आणी नावाजलेल्या चित्रपटासाठी कोणतीही अभिनेत्री का तयार नव्हती? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.


या चित्रपटात माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होती आणि चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा शोध सुरू होता. यश चोप्रा प्रथम करिश्मा कपूरच्या भूमिकेसाठी करिश्माकडे गेले होते, पण सुरुवातीला त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला.


करिश्मा कपूरनेच एका शोमध्ये खुलासा केला होता की, तिला या चित्रपटात काम करायचे नव्हते. नंतर दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या विनंतीवरून त्यांनी चित्रपटात काम केले. ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.


कोणत्याही अभिनेत्रीसाठी हे सोपे नव्हते


करिश्मा कपूर माधुरीसोबत डान्स करताना नर्व्हस होती. याआधीही या कारणामुळे मोठ्या अभिनेत्रींनी निशाची भूमिका नाकारली होती. वास्तविक, माधुरी एक उत्तम नृत्यांगना आहे आणि तिच्यासोबत नृत्य करणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी सोपे नव्हते.


तसेच माधूरीला मुख्य भूमिकेत संधी मिळाल्यामुळे तिच्य़ासोबत काम करणं दुसऱ्या अभिनेत्रींना मान्य नव्हतं, ज्यामुळे त्यांनी हे करण्यासाठी नाकारलं


करिश्मा कपूरपूर्वी जूही चावला, उर्मिला मातोंडकर, मनीषा कोईराला आणि काजोल यांना निशाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र माधुरीमुळे सर्वांनी काम करण्यास नकार दिला होता. माधुरीमुळे आपली भूमिका लपली जाईल, अशी भीती सर्वांच्या मनात होती.