Aishwarya Rai-Abhishek Bachchan Divorce Rumours : कुठल्या ना कुठल्या कारणाने बच्चन कुटुंब कायम चर्चेत असतं. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये काही बिनसलंय अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने या अफवाना हवा मिळते. या दोघांचा घटस्फोट निश्चित आहे, अशी चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. यासाठी निमित्त ठरलं आधी काशी विश्वानाथ दर्शन आणि त्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न सोहळा. 


कुठे तरी पाणी मुरतेय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक बच्चन हा आई जया बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन नंदा हिचा सोबत गुरुवारी 11 जुलै 2024 ला वाराणसीला गेला होता. तिथे त्याने काशी विश्वासनाथाचे दर्शन घेतलं आणि पूजा केली. पण यावेळी पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या उपस्थितीत नव्हती. 



त्यामुळे चाहत्यांचा भुवया उंचावल्या. एवढंच नाही तर 12 जुलै 2024 शुक्रवारी मुंबईतील बहुचर्चित लग्न सोहळ्यात अख्ख बच्चन कुटुंब एकत्र आलं पण सून ऐश्वर्या आणि नात आराध्या दिसली नाही. 


अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण बच्चन कुटुंब अमिताभ बच्चन, जया बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता नंदा बच्चन, नात नव्या नंदा, नातू अगस्त्य नंदा आणि जावई निखिल नंदा एका फ्रेममध्ये दिसून आले. 



याच सोहळ्याला ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासह काही वेळानंतर वेगळी एन्ट्री घेते. 





त्यामुळे बच्चन कुटुंब आणि ऐश्वर्यामध्ये काही वाद आहे का? असा प्रश्न चाहते विचार आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोट होणार हे जवळजवळ निश्चित दिसतंय असं या दोन घटनांवरून तर्क चाहते लावत आहेत. 


काय म्हणाले नेटकऱ्यांनी?


ऐश्वर्याला बच्चन कुटुंबासोबत न पाहिल्यानंतर नेटिझन्सही तर्कविर्तक लावले आहे. नेटिझन्सनी अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहेत. 



एका यूजरने लिहिलंय की, 'ऐश्वर्या आणि तिची मुलगी कुठे आहेत? हे चांगले नाही'. एका यूजरने लिहिलंय की, 'त्यांनी ऐश्वर्या आणि आराध्याला वेगळे केलंय'. 'ऐश्वर्या बेपत्ता आहे, तिच्याशिवाय कुटुंब अपूर्ण आहे', अशी टिप्पणी आणखी एका यूजरने केलीय.