मुंबई : मिस युनिव्हर्स हरनाज संधू आणि अभिनेत्री उपासना सिंग यांच्यातील वादामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मिस युनिव्हर्सला अशाप्रकारे कोर्टात खेचण्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रकरणी उपासना सिंहने याचिका दाखल करून आपली बाजूही मांडली आहे, मात्र आतापर्यंत हरनाज संधूने यावर पूर्णपणे मौन बाळगले आहे.  7 महिन्यांपूर्वी हरनाजने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला तेव्हा दोघांचे नाव खूप गाजले. त्यावेळी उपासना सिंहने एका मुलाखतीत सांगितले होते की, हरनाज संधूसोबत त्यांच नातं किती जवळचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनाज संधू उपासना सिंगसोबत राहत होती 
एका मुलाखतीत उपासना सिंहने स्वतः सांगितलं होतं की, मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाईपर्यंत हरनाज संधू तिच्यासोबत रहायची. ती फक्त राहिली नाही तर घरच्या कामातही मदत करायची. यासोबतच उपासनाने असेही सांगितले होते की, मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर हरनाजने स्वतः उपासनाशी फोन करून बातचीत केली होती आणि आपल्या यशाबद्दल सांगितले होते. हरनाजने यापूर्वी मिस पंजाबचा किताब पटकावला असल्याने ती उपासना सिंगच्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री देखील होती.



आता जेव्हा उपासनाने हरनाजचे इतकं कौतुक केल्यानंतर तिच्यावर गुन्हा दाखल केला, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय आणि मिस युनिव्हर्स हरनाज संधू उपासना सिंग यांच्यासोबत अशी का वागली, असा प्रश्न पडतो. हरनाजची नजर आता बॉलिवूडकडे आहे का? वास्तविक, हरनाजने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला नसताना पंजाबी चित्रपट साइन केला होता, पण आता ती एक विश्व सुंदरी बनली आहे, त्यामुळे कदाचित तिला बॉलिवूडमधून करिअरची सुरुवात करायची असेल. मात्र उपासना सिंग या प्रकरणात कोणतीही हलगर्जीपणा करण्याच्या मनस्थितीत नाही आणि तिने हरनाजला कोर्टात खेचले आहे.