मुंबई : 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका सध्या सगळ्यांचीच फेवरेट मालिका बनली आहे. या मालिकेत श्रींमत आणि गरिब घरातील परिस्थिती दाखवण्यात आली  आहे. सोबतच या मालिकेतील कलाकारांनी दमदार अभिनयाच्या जोरावर आपलं पात्र घराघरात पोहोचवलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओम आणि स्वीटू यांची केमिस्ट्री सध्या सगळेच एन्जॉय करत आहेत. दोघांच्या मैत्रीपासून ते प्रेमाच्या अलीकडची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. त्यात आता  या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 


लवकरच ओम आणि स्वीटू  विवाहबंधनात अडकणार आहेत. या मालिकेत सनई-चौघडे वाजताना दिसणार आहेत. दोघेही एकत्र पुढचा प्रवास करण्यासाठी एकमेकांना  वचन देणार आहेत. 


आतापर्यंत दोघांच्या प्रेमात अनेक चढ-उतार आले. दोघांना लांब ठेवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. कधी ओमच्या घरातील काही व्यक्ती मधे आल्या, तर कधी  स्वीटूच्या घरच्यांनी ओमला नाकारलं..


आता अखेर सर्व रुसवे फुगवे सोडून या दोघांच्या नात्याला सगळ्यांचा होकार मिळणार आहे. पण हा विवाह होत असताना यात काय नवा ड्रामा रंगणार का? हे देखील  पाहणं तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे.