Janhvi Kapoor Statement on breakup: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या 'उलझ' (Ulajh) या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  नुकत्याच झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात जान्हवीच्या लुकची चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या फुड पॉइझनिंगमुळे तिला रुग्णालयात देखील भरती करावं लागलं होतं. अशातच आता तिला डिस्चार्ज देखील मिळाला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर जान्हवी (Janhvi Kapoor heartbreak) पुन्हा कामाला लागलीये. त्यातच आता जान्हवीने एका मुलाखतीत ब्रेकअपवर मोठं वक्तव्य केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जान्हवी कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या डेटिंग लाईफवर खुलासा केला आहे. मी प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करते. त्यामुळे प्रत्येक मुलगी स्वत:ला रिलेट करू शकते, असं जान्हवी कपूरने म्हटलं आहे. माझा पहिला ब्रेकअप एवढा काही खास नव्हता, कारण माझा बॉयफ्रेंड लगेच माझ्याजवळ परत आला होता. आयुष्यात माझा मन फक्त एकवेळा तुटलं आहे. परंतू तो व्यक्ती माझ्याकडे परत आला अन् त्याने तुटलेलं मन जोडलं. त्यामुळे सगळं काही ठीक झालं, असंही जान्हवी कपूर म्हणते.


जान्हवीने मुलाखतीत म्हटलं की, मी प्रत्येक महिन्याला बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप करत होती आणि लगेच पॅचअप करत होते. माझ्या मासिक पाळीच्या काळात काही वर्षे, दर महिन्याला दोन-तीनवेळा मी त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप करत असे. सुरुवातीचे दोन-तीन महिने तो शॉकमध्ये होता, पण त्यानंतर मी पुन्हा हा ठिक आहे म्हणत पुन्हा दोन दिवसानंतर रडत रडत सॉरी म्हणत त्याच्या जवळ जात होते. मला कळत नव्हतं की माझं डोकं असं काम करतंय, असंही जान्हवीने यावेळी सांगितलं.


दरम्यान, जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहारियाला डेट करत असल्याची माहिती सध्या आहे. तिने शिखरला याआधी देखील डेट केलं होतं, परंतू नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. मात्र आता हे दोघं पुन्हा एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी दोघंही सोबत दिसले होते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं होतं.