मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरू आहे. अशातच कंगना रनौतलाही लग्न करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनं लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कंगना ही तिच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखली जाते. स्वतःती परखड भूमिका ती नेहमीच मांडत असते. स्पष्ट बोलून ती अनेकांचं तोंड बंद करते. कंगना तिच्या लव लाईफबाबतही नेहमीच चर्चेत असते. कंगनाचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन्स आहेत मात्र तरीही कंगनाला वाटतं की तिचं लग्न होऊ शकत नाही. याचं कारणंही नुकतंच कंगनानं सांगितलं आहे.



कंगनानं नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की, तिचं लग्न होत नाहीय कारण अनेकांकडून ती भांडखोर असल्याची अफवा पसरवलं जात असल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. लोकांना असं वाटतं की कंगना खूप रूड आहे, त्यामुळे ती नेहमीच सर्वांशी भांडत असावी.


एका मुलाखतीत गमतीत म्हटलं की, अशा लोकांच्या अफवांमुळे माझ्याबद्दल एक मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे परफेक्ट मॅच मुलगा मिळत नसल्याचं कंगनानचं म्हणणं आहे.



कंगनाचा ऍक्शन-थ्रिलर चित्रपट 'धाकड' लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री ऍक्शन करतानाही दिसणार आहे. अशा स्थितीत सिद्धार्थ काननच्या एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले की, ती खऱ्या आयुष्यात तिच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा इतकी धाकड आहे का? यावर हसतच कंगना म्हणाली - असं नाही. खऱ्या आयुष्यात मी कोणाला मारणार? मी लग्न करू शकत नाही कारण तुम्ही लोक माझ्याबद्दल अशा अफवा पसरवत आहात.