मुंबई : 'कुछ कुछ होता है' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आजही फेव्हरेट सिनेमांमध्ये हा सिनेमा गणला जातो. शाहरूख, काजोलची केमिस्ट्री आणि राणी मुखर्जीचा खाज अंदाज आपल्याला पाहायला मिळाला. मैत्री आणि प्रेम यांच्यावर आधारित हा सिनेमा आजही आवर्जून पाहिला जातो. कुछ कुछ होता है या सिनेमाच्या चाहत्यांसाठी आता आणखी एक खुशखबरी.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्माता करण जोहरने सांगितलं आहे की, जर कधीही त्याने कुछ कुछ होता है च्या सिक्वलचा विचार केला. तर तो अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूरला घेऊन हा सिनेमा बनवणार आहे. 1998 मध्ये 'कुछ कुछ होता है' या सिनेमातून करण जोहरने आपल्या दिग्दर्शनाला सुरूवात केली. या सिनेमांत शाहरूख खान, काजोल आणि राणी मुखर्जी कास्ट केलं होतं. 


इश्क 104.8 वर या चॅलनवर 'कॉलिंग करण सिझन 2' कार्यक्रमा दरम्यान प्रेक्षकाने विचारलं की, कुछ कुछ होता है या सिनेमाचा रिमेक कधी तयार करणार असल्याचा प्रश्न विचारला. तेव्हा हा देखील प्रश्न विचारला होता की, यामध्ये कोण कोण कलाकार असणार आहे. तेव्हा करण जोहर म्हणाला की, जर मी पार्ट 2 बनवला तर  रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरला कास्ट करेन.