मुंबई : 'बजरंगी भाईजान' ' (Bajrangi Bhaijaan) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. सलमान (Salman Khan) करिना (Kareena Kapoor) कपूरच्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली होती. आता या सिनेमाच्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचं नाव पवन पुत्र भाईजान (Pavan Putra Bhaijaan) अशी बातमी सध्या समोर येतेय. पण यासोबतच करिनाच्या चाहत्यांसाठी मात्र एक वाईट बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिनाने बजरंगी भाईजानमध्ये महत्वपुर्ण भूमिका साकारली होती. पण या सिनेमाच्या पुढच्या भागात करिना कपूर दिसणार नाहीयेत. त्यामुळे तिचे चाहते नाराज आहेत. पण या सिनेमात करिनाला कोण रिप्लेस करणार आहे? आणि या सिनेमात करिना का दिसणार नाही? याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


Bajrangi Bhaijaan 2 मध्ये करिना नाही तर ही अभिनेत्री झळकणार मुख्य भूमिकेत
या सिनेमात का दिसणार नाही याबद्दल अद्याप समोर आलेलं नाहीये. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, बंजरंगी भाईजानच्या दुसऱ्या भागासाठी पुजा हेगडेच्या नावाची सध्या चर्चा आहे. एक्ट्रेस पूजा हेगड़े (Pooja Hegde) करिनाला रिप्लेस करु शकते असं म्हटलं जात आहे. खरंतर या बाबतची अद्याप माहिती समोर आलेली नाहीये मात्र असं म्हटलं जातंय की, पूजा हेगडेला या सिनेमाी ऑफर आली आहे.


सलमान खानसोबत पूजा हेगडे  बंजरंगी भाईजान 2 (Bajrangi Bhaijaan 2) व्यतरिक्त 'किसी का भाई किसी की जान' या सिनेमामध्ये देखील दिसणार आहे. याआधी सलमान खान आणि पूजा हेगडेच्या अफेअर्सच्या चर्चाही खूप रंगल्या होत्या. अनेकदा हे दोघं स्पॉटही झाले होते. बऱ्याचदा हे दोघं ऐकमेकांच्या प्रेमात असल्याचं म्हटलं जात होतं. पण या बातमीवर या दोघांनी कायमच मौन बाळगलं. हे दोघं ऐकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. 


'बजरंगी भाईजान' सिनेमाची कथा
या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीने पाकिस्तानी पत्रकार चांद नवाब यांची भूमिका साकारली होती. 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात मुन्नी या मूक पाकिस्तानी मुलीची कथा दाखवण्यात आली होती. ती तिच्या आईसोबत भारतात येते आणि तिच्यापासून विभक्त होते. त्यानंतर, मुन्नी सलमान खानला भेटते आणि मग सलमान खान तिला पाकिस्तानला तिच्या आईकडे सोडण्याचं मिशन हाती घेतो. ही भावूक हृद्यस्पर्शी स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडली होती