मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. करिश्माने चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्री 90 च्या दशकात सिनेसृष्टीला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. कपूर कुटूंबीयातून असूनही करिश्मा हवी तेवढी सक्सेस होवू शकली नाही.  तिचे अनेक सिनेमा फ्लॉपही झाले होते. पण तिचे बरेच चित्रपट हिटही झाले होते. अनेकदा ती तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. तर दुसरीकडे अक्षय कुमार हा देखील बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा अभिनय आजही प्रेक्षकांना भुरळ घालतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षयने आत्तापर्यंत बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. मात्र अक्षयही सध्या फ्लॉप अभिनेत्यांमध्ये सामिल झाला आहे. सध्या अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करत नाहीत. बॅक टू बॅक अक्षयचे सिनेमा फ्लॉप होत आहेत. मात्र करिश्माने अक्षयसोबत अनेक सिनेमा करायला नकार दिला होता. ती अक्षयचं नाव ऐकताच चित्रपट नाकारायची. ती नेमकं असं का करायची याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


ही तेव्हाची गोष्ट आहे. जेव्हा करिश्मा कपूर तिच्या करिअरच्या बाबतीत उंचीच्या शिखरावर होती. तर दुसरीकडे अक्षयही त्याच्या करिअरमध्ये खूप पुढे होता. मात्र अक्षय कुमारने करिश्मा कपूरसोबत 'दीदार' या चित्रपटात पहिला चित्रपट साईन केला होता. पहिल्यांदाच हे दोघंही एकत्र काम करत होते. अक्षयचा हा पदार्पणाचा सिनेमा होता. मात्र हा सिनेमा सुपर फ्लॉप झाला. यानंतर 'सपूत' आणि 'मैदान-ए-जंग', 'लहू के दो रंग' असे अनेक सिनेमा त्याचे फ्लॉप होऊ लागले. यानंतर अभिनेत्री त्याच्यासोबत काम करण्यास घाबरु लागली. 


करिश्मा त्यावेळी उंचीच्चया शिखरावर होती. आणि अक्षयचं अपयश पाहून ती त्याच्यासोबत काम करण्यास नकार देऊ लागली. कारण अभिनेत्रीला फ्लॉप चित्रपटांचा धोका पत्करायचा नव्हता. यानंतर करिश्माने संघर्ष सिनेमाला सुरुवातीला होकार दिला पण जसं तिला समजलं की, या सिनेमा अक्षय तिच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. त्यावेळीसच तिने या सिनेमाला नकार दिला. यानंतर  प्रीती झिंटाने ही भूमिका साकारली. हा सिनेमा खूप हिट झाला. 


यानंतर 'हेराफेरी' सिनेमालाही करिश्माने याच कारणासाठी नकार दिला. असं म्हटलं जातं की, अक्षय या सिनेमा आहे असं कळताच अभिनेत्रीने हा सिनेमा करायला नकार दिला. वैयक्तिक समस्यांचे कारण देत करिश्माने हा चित्रपट सोडला. मात्र हा देखील सिनेमा खूप हिट झाला. यानंतर करिश्मा आणि अक्षयचा जंवार हा सिनेमा आला आणि तो सुपरहिट ठरला. आजही हे दोखं एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.