जयपूर : प्रसिद्ध अभिनेते श्रीवल्लभ व्यास यांचं दीर्घ आजारने निधन झालं.अभिनेता आमिर खानच्या लगान सिनेमात ईश्वर काकांची अविस्मरणीय भूमिका श्रीवल्लभ व्यास यांनी साकारली होती.  जयपूरमध्ये श्रीवल्लभ व्यास यांनी अखेरचा श्वास घेतला.


रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या आजार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीवल्लभ व्यास यांनी जवळपास 50 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. श्रीवल्लभ व्यास यांना काही दिवसांपासून रक्तदाब आणि अर्धांगवायूच्या आजाराचा त्रास होता. अनेक दिवस आजाराला तोंड दिल्यानंतर आज अखेर जयपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली.


लगानमधील ईश्वर काकांची भूमिका


श्रीवल्लभ व्यास यांनी काही मालिकांमध्येही  भूमिका साकारल्या आहेत. 2008 साली त्यांची प्रकृती बिघडली, त्यानंतर त्यांना ब्रेक घ्यावा लागला.अभिनेता आमिर खानच्या लगान सिनेमात ईश्वर काकांची अविस्मरणीय भूमिका श्रीवल्लभ व्यास यांनी साकारली होती.