मुंबई : 'लागीर झालं जी' मालिकेने प्रेक्षकांवर एक गारूड घातलं. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारबाबतची कोणतीही गोष्ट जाणून घेण्सा प्रेक्षक उत्सुक असताना. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अज्या म्हणजे अभिनेता नितीश चव्हाणच्या जीवाला धोका असल्याचं समोर आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता नितीश चव्हाणने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्याने आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. 'आम्ही पळून जाऊन लग्न केलंय.... आमच्या जीवाला धोका आहे.' असं लिहिलेला एक फलक हातात घेऊन नितीश चव्हाणने फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 


हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. आपल्याला माहितच आहे अज्या म्हणजे नितीश चव्हाण अभिनेता तर आहेच पण त्यासोबत तो उत्तम डान्सर देखील आहे. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. 



नितीशने ही पोस्ट अभिनेत्री मानसी भावलकरला टॅग केली आहे. म्हणजे नितीशने अभिनेत्री मानसीसोबत लग्न केलंय का? अशी चर्चा रंगली आहे. 


या पोस्टखाली अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेकांनी नितीशला लग्नाकरता शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक मुलींनी आपलं मन तुटल्याची भावना व्यक्त केली आहे. तर अनेकांनी त्याच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे. 


यासोबतच काही जणांनी हा प्रमोशनचा फंडा असल्याचं म्हटलं आहे. प्रमोशनकरता अनेकदा असे नवनवे पर्याय वापरले जातात. एखाद्या नव्या प्रोजेक्टमध्ये नितीश आणि मानसी एकत्र दिसतील असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे. 


नक्की मानसी आणि नितीश यांच लग्न झालं आहे का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पण सध्या नितीशची पोस्ट चर्चेत आहे.