COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : अजय आणि शीतल यांच्या लग्नाची महाराष्ट्राला उत्सुकता आहे.  30  मे रोजी हा लग्नसोहळा तुम्हाला पाहता येणार आहे.  पण त्याआधीच आम्ही तुम्हाला अज्या आणि शीतलीचा हा लग्नसोहळा झी २४ तासवर दाखवणार आहोत. साताऱ्यात या लग्नाची लगबग सुरू होती. बँड, बाजा, वाजंत्री, लग्नाची तयारी, पाहुण्यारावण्यांचं स्वागतासाठी सज्ज आङे.  हा सगळा सोहळा सुरू होता साताऱ्यात अज्या आणि शितलीच्या लग्नाचा.


पुढच्या काही दिवसांतच अज्या आणि शितलीचा हा लग्नसोहळा लागिरं झालं जी मालिकेत पाहायला मिळणार आहे. साताऱ्यातल्या चांदवडी गावाजवळ असणा-या एका मंगलकार्यालयात अज्या आणि शितलीचं लग्न झालं. पण या लग्नामध्येही शीतल आणि अजय या दोघांनी एक सामाजिक संदेश दिलाय. या दोघांचंही लग्न सामुदायिक विवाहसोहळ्यात झाल्याचं दाखवण्यात आला आहे. तसेच या महिन्यातच "लागिर झाल जी" मालिकेला १वर्षे पुर्ण झाल असुन यापुढे मालिकेत वेगळे बदल पहायला मिळणार असल्याचे निर्मात्या श्वेता शिंदे यांनी सांगितलय


गेल्या पंधरा दिवसापासून या मालिकेत विवाहाची लगबग दिसत आहे.   सामुदायिक विवाह सोहळ्याची तयारी चालू असल्याने या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याच घरातील लग्नसराई असल्यासारखे काम करताना दिसत आहे या निमित्ताने  सामुदायिक विवाह सोहळ्यातील या क्षणा विषयी अजिंक्य आणि शितल यांना काय वाटते त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 



लग्नात अजिंक्यचे दोन जीवलग मित्र राहुल आणि विक्रम हे देखील लग्नात खुप धमाल मस्ती करताना दिसत आहेत अजिंक्यचे लग्न पार पडल्यामुळे त्यांना खुप आनंद झाला आहे. आपल्या 2 जवळच्या व्यक्ती लग्नबंधनात अडकल्याने ते खूप खूष आहेत.