मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपलपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेता मलायका अरोरा. कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दोघांनी त्यांच्या नात्याला अधीक महत्त्व दिलं. अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांच्यातील जवळीक वाढली. दोघांनी त्यांचं नातं सर्वांसमोर मान्य देखील केलं आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर मलायका आणि अर्जुनला लग्न कधी करणार असा प्रश्न सतत विचारण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' शोमध्ये अर्जुनला करणने 'मलायकासोबत लग्न करणार आहेस?' असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना अर्जुने उघडपणे उत्तर दिलं. एवढंच नाही तर त्याने मलायकासोबत असलेल्या नात्याला महत्त्व देखील दिलं. 



लग्नाबद्दल अर्जुन म्हणाला, 'माझं लक्ष सध्या पूर्णपणे करियरकडे आहे. मला प्रोफेशनली स्थिर व्हायचं आहे. मला असं काम करायचं आहे, ज्यामुळे मला आनंद मिळेल. कारण जोपर्यंत मी आनंदी राहू शकत नाही, तोपर्यंत मी माझ्या पार्टनला आनंदी ठेऊ शकत नाही.'


अर्जुनच्या उत्तरावरून कळालं की अद्याप तरी अर्जुनचा लग्नाचा विचार नाही.  अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये इन्स्टाग्रामवरून याची जाहीर घोषणाही केली होती.