मुंबई : दाक्षिणात्य कला जगतामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन याची लोकप्रियता सध्या परमोच्च शिखरावर आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळं विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावरही त्यानं राज्य केलं आहे. (Allu Arjun Pushpa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्लू अर्जुनच्या अभिनयावर प्रेक्षक इतकं भाळण्याची ही पहिलीच वेळ नाही. फक्त रुपेरी पडदा नव्हे, तर समाजातही अल्लू अर्जुननं मानाचं स्थान मिळवलं आहे. त्याहीपेक्षा त्यानं हे स्थान जपलं आहे. 


याच कारणामुळे त्यानं चित्रपटांच्या बाबतीलही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यानं प्रेक्षकांशी असणाऱ्या आपल्या या नात्याचा उलगडा केला. 


चाहत्यांशी असणाऱ्या नात्यासंदर्भात सांगताना तो म्हणाला, हे अतिशय सुंदर नातं असतं. मी याकडे एक जबाबदारी म्हणून पाहतो. कारण, मी त्यांना उत्तरदायी आहे. 
 
‘प्रेक्षकांना काही झालं तर मला त्यांची काळजीही घ्यावी लागेल. हे एक प्रकारे देवाणघेवाणीचं नातं आहे. प्रेक्षकांनी आपल्याला इतकं काही दिलं आहे. त्याच्या बदल्यात आपण काही परतफेड करु शकल्यास हे भाग्यच’, असं अल्लू अर्जुन म्हणाला. 


... असे चित्रपट नाही साकारत 
कमर्शिअल चित्रपटाच्या बाबतीतही अल्लू अर्जुन बरीच काळजी घेतो, यासंदर्भातला खुलासा त्यानंच केला. 


‘व्यावसायिक चित्रपट साकारताना मी काळजी घेतो की मुलांना कोणताही संकोचलेपणा वाटणार नाही. फक्त मुलंच नव्हे तर चित्रपट पाहायला आलेल्या महिलांनाही यामुळं संकोच वाटता कामा नये. 


मी अशा चित्रपटात कधीच काम करणार नाही, जे मी माझी पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नाही. चित्रपट मी सहजपणे पत्नी आणि मुलीसोबत पाहू शकत नसेल तर तो मी साकारणारच नाही’, असं अल्लू अर्जुननं स्पष्ट केलं. 


दरम्यान येत्या काळात अल्लू  अर्जुन ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला प्राधान्य देताना दिसणार आहे. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतरच पुढच्या पर्यायांचा विचार करेन असंही त्यानं सांगितलं.