Niharika Konidela and Chaitanya Jonnalagadda Official Divorce: नात्यांची मूठ कितीही बांधून ठेवली तरीसुद्धा ती प्रत्येकवेळा टिकून राहिलीच असं नाही. त्यातून लग्नाच्या गाठीही कधी मोडतील हेही काही सांगता येत नाही. बॉलिवूडच्या नातेसंबंधांवर अनेक सोशल मीडियावर नाना तऱ्हेची चर्चा रंगताना दिसते. कोणाचे ब्रेकअप झाले किंवा कोणाचा घटस्फोट झाला तर सर्वात आधी सगळ्यांच्या नजरा या आधी त्यांच्याकडेच वळतात. आता सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे दाक्षिणात्त्य अभिनेता आणि अभिनेत्री चैतन्या आणि निहारिका यांची. ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांची नाहारिका ही भाच्ची आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनूसार असे कळते आहे की, त्या दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे परंतु त्याविषयी मात्र त्या दोघांनी आत्तापर्यंत काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या माहिन्यापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना जोरात उधाण आले होते खासकरून जेव्हा त्यांनी एकमेकांना इन्टाग्रामवरून अनफॉलो केले होते तेव्हाापासून ते वेगळे आले आहेत का? तेव्हापासून त्यांच्या घटस्फोटाच्याही चर्चांना उधाण आले होते. आता पुन्हा एकदा या सर्व चर्चा रंगल्या आहेत. निहारिकानं आपल्या लग्नाचे, साखरपुड्याचे फोटोही काढून टाकले आहेत. त्यामुळे तेव्हापासून या चर्चांना जोरात उधाण आले होते. आता यापुढे निहारिका आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सांगणार आहे का? याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे राम चरण आणि अभिनेते चिंरजीवी यांच्या घरातील एका जवळच्या व्यक्तीच्या लग्नाचा प्रवास इथेच संपल्या असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. प्रादेशिक माध्यमांनुसार त्यांनी अधिकृत घटस्फोट घेतल्याच्या चर्चा आहेत. 


हेही वाचा - Kitchen Hacks: पावसाळ्यात अन्नाला बुरशी लागण्याची भिती? 'हे' घरगुती जुगाड करा आणि राहा टेंशन फ्री


चैतन्या पोहचला विपश्यना केंद्रात? 


चैतन्यानं इन्टाग्राम पोस्टवर एक अपडेट दिली होती ज्यात तो 10 दिवसासाठी Global Vipassana Pagoda meditation Center मध्ये गेला असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यानं कॅप्शमध्ये लिहिलं आहे की, माझे हृदय या जागेबद्दल आणि मला येथे घेऊन गेलेल्या प्रत्येकाबद्दल कृतज्ञतेने भरले आहे. पुढील 10 दिवसांत माझ्या जीवनात विपश्यना आणि ध्यानसाधना करण्याची उत्कंठावर्धक तरीही थकवणारी प्रक्रिया होती. हा माझ्या अस्तित्वाचा आतापर्यंतचा सर्वोत्तम अनुभव होता. क्वचितच एखाद्याच्या आयुष्यात ते कुठल्याच अपेक्षेशिवाय कुठेतरी जातात आणि याची त्यांना गरज आहे हे त्यांना कधीच माहीत नव्हत अशी माझी अवस्था आहे. कृतज्ञता आणि फक्त कृतज्ञता.


हेही वाचा - आई झाल्यानंतर शुटिंग करताना अशी झाली होती आलियाची अवस्था, म्हणाली, ''मी दमले होते पण...''



अशी होती परीकथा....


चैतन्या जोन्नालगड्डा आणि निहारिका कोनिडेला यांचे 9 डिसेंबर 2020 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न झाले. त्यांच्या लग्नाच्या कोण चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनाही बराच आनंद झाला होता. परंतु पुढच्या तीन वर्षात मात्र या आनंदाला ग्रहणचं लागले. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या घटस्फोटाच्या जोरात चर्चा रंगताना दिसत आहेत.