मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझ्यापेक्षा चांगले अभिनेते आहेत, अशी टीका दिग्गज अभिनेता प्रकाश राजनं केलं आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल पंतप्रधान अजून काहीही बोलले नाहीत, यावर प्रकाश राजनं प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतरही पंतप्रधानांनी लक्ष दिलं नाही तर मिळालेले राष्ट्रीय पुरस्कार परत करताना मला अजिबात दु:ख होणार नाही, असं प्रकाश राज म्हणालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या ११व्या राज्य संमेलनामध्ये प्रकाश राजनं ही टीका केली आहे. गौरी लंकेश यांची ज्यांनी हत्या केली त्यांची माहिती अजूनही मिळालेली नाही. पण गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर काहींनी सोशल नेटवर्किंगवर उत्सव साजरा केला. आपल्याला सगळ्यांना हे लोक कोण आहेत आणि त्यांची विचारधारा काय आहे हे माहिती आहे, असं वक्तव्य प्रकाश राजनं केलं आहे.