मुंबई : प्रत्येक कलाजगताची आपली अशी एक वेगळी ओळख असते. पण, यासोबतच काही अशाही गोष्टी असतात ज्याबद्दल सहसा बोललं जात नाही. किंबहुना अशा विषयांवर बोलणं टाळलं जातं. दाक्षिणात्य कलाजगतही त्यापासून वेगळं राहू शकलेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर मग, जाणुन घेऊया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही डर्टी सिक्रेट्स... 


उदय किरण नावाचा एक अभिनेता पदार्पणानंतर लगेचच प्रकाशझोतात आला. अभिनेता चिरंजीवी यांच्या मुलीशी त्यानं साखपुडाही केला. पण, हे नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. 2014 मध्ये या अभिनेत्यानं आत्महत्या करत सर्वांनाच धक्का दिला. 



अभिनेत्री श्रीरेड्डी हिनं दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळामध्ये कास्टींग काऊचविरोधात आवाज उठवला होता. यानंतर तिला एका निर्मात्याच्या ऑफिसबाहेर टॉपलेस पाहिलं गेलं होतं. 



अभिनेत्री काजल अग्रवाल ही तिच्या आणि रणदीप हुड्डा याच्या एका किसींग सीनमुळे बरीच चर्चेत आली. 


पण, मुळात काजलनं दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अनेकदा बोल्ड किसींग सीन देत सर्वांना धक्का दिला होता. 



अभिनेता नंदामुरी बालकृष्ण यांची लोकप्रियता कमी नाही. त्यांचा रागाचीही सर्वांनाच कल्पना आहे. पण, कहर तेव्हा झाला ज्यावेळी त्यांनी बेलमकोंडा श्रीनिवास यांच्या वडिलांवरच गोळी झाडली होती. 



अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्या वैवाहिक नात्यात आलेल्या वादळाला फार काळ लोटलेला नाही. 


समंथाचे बोल्ड सीन, आयटम साँग आणि ऑनस्क्रीन इंटिमसीला तिच्या पतीसह सासरच्यांचा विरोध होता अशी माहिती समोर आली. 



मुळात समंथानं आपला विश्वासघात केल्याची भावना त्यांच्या मनात घर करुन गेली. परिणामी या नात्याचा अनपेक्षित शेवट झाला.