मुंबई : परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक राजकीय मंडळी नुकसानग्रस्त भागांची पहाणी करत आहेत तर, दुसरीकडे समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट मत मांडणारे दिग्दर्शक प्रवीण तरडे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. त्याचप्रमाणे इतर कलाकारांना देखील मदतीचा एक हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे.