मंबई : बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीवरून चांगलाचं वाद रंगत आहे. यापूर्वी देखील घराणेशाहीवर अनेकांनी निशाना साधला होता. मात्र अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर या वादाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.  सुशांतची  आत्महत्या नव्हे तर हत्या आहे आणि ही हत्या बॉलिवूडमध्ये असलेल्या घराणेशाहीमुळे झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. वातावरण अधिक तापलेलं असताना दिग्दर्शक आर बाल्कीयांच्या वक्तव्यामुळे घराणेशाहीच्या वादाने जास्त जोर धरला आहे. आलिया-रणबीर सर्वोत्कृष्ट कलाकार असल्याचं ते म्हणाले आहे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले- माझ्यासमोर  अभिनेत्री आलिया भट्ट किंवा अभिनेता रणबीर कपूरपेक्षा चांगला अभिनेता आणून दाखवा , मग मी वादविवाद करण्यास तयार आहे. असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. 



अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं आपल्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. कित्येकांसाठी ही घटना मानसिक धक्का देणारी होती.


सध्याच्या घडीला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांच्या हाती आहे. ज्याअंतर्गत त्यांनी जवळपास ३५ जणांचे जबाबही नोंदवले आहेत. परंतु पोलिसांच्या हाती अद्याप ठोस कारण सापडले नाही. त्याच्या आत्महत्ये प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे.