मुंबई : अभिनेता मनोज  बाजपेयी स्टारर 'मर्डर मिस्ट्री सायलेंस' नंतर आता झी 5वर  आणखी एक सस्पेंस थ्रिलर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं नाव 'रात बाकी है' असं आहे. सिनेमाची कथा एका हत्येच्या अवती-भोवती फिरत आहे. सिनेमात  अनूप सोनी, पाओली दाम आणि राहुव देव मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.  सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अविनाश दासच्या खांद्यावर आहे. 



सिनेमाच्या कथा प्रेम, फसवणूक, बदला यासर्व गोष्टींवर आधारलेली आहे. तब्बल 12 वर्षांनंतर दोन प्रेमी एकमेकांना थरारक परिस्थितीत भेटतात. त्यांच्यावर हत्येचे आरोप करण्यात आल्यामुळे दोघेही फरार होतात. सिनेमा 16 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.