मुंबई : आयुषमान खुराना, क्रिती सॅनॉन आणि राजकुमार राव या त्रिकुटावर आधारित बरेली की बर्फी या सिनेमाला समीक्षक तसेच प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमात राजकुमार रावच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जातेय. या सिनेमानंतर तर राजकुमारला अनेक मुलींकडून लग्नाचे प्रस्तावही आलेत. खुद्द राजकुमारनेच हे सांगितलेय.


बरेली की बर्फीमधील माझी भूमिका पाहिता अनेक मुलींनी मला लग्नासाठी विचारले. अनेक मुलींनी ट्विटर तसेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मला लग्नासाठी विचारले, असे राजकुमार म्हणाला.