मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नात्याबाबत आता नव्यानं काही प्रस्तावना मांडण्याची गरज नाही. कारण, या जोडीनं आता त्यांच्या नात्याची सुरेख ग्वाहीसुद्धा दिली आहे. जेव्हापासून बी- टाऊनच्या या जोडीचं नातं सर्वांसमोर आलं तेव्हापासूनच ते केव्हा विवाहबंधनात अडकतात याचीच चर्चा सुरु झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेर काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली, की डिसेंबर महिन्यात ही जोडी विवाहबंधनात अडकत त्यांच्या नात्याची सुरुवात करेल असं म्हटलं गेलं. पण, आता म्हणे त्यांचं डिसेंबर महिन्यातील लग्नही टळलं आहे. (Ranbir Kpoor Alia bhatt Wedding)


चाहत्यांसाठी ही बातमी काहीशी नाराज करणारी. रणबीर – आलियाचं लग्न नेमकं का लांबतंय हाच प्रश्न आता चाहत्यांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या प्रश्नाचं उत्तरंही आता समोर आलं आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार या जोडीच्या इटलीमधील लग्नाच्या चर्चा तथ्यहीन आहेत. सध्या ही जोडी डिसेंबर नव्हे, तर जानेवारी 2022 मध्ये ही जोडी मुंबई किंवा राजस्थानमध्ये त्यांच्या नात्याची नवी सुरुवात करण्याचे बेत आखत आहे.


कुटुंब आणि काही खास मित्रांची या विवाहसोहळ्यासाठी उपस्थिती असेल. रणबीर सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण उरकून आणखीही काही उरलेली कामं तो पूर्ण करणार आहे.


आलियाही डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तिची कामं मार्गी लावणार आहे. ही जोडी कामाप्रती बरीच समर्पक आणि प्रामाणिक असल्यामुळे कामं संपवूनच जानेवारी महिन्यात लग्न करण्याचा विचार करत आहे.


घाईघाईमध्ये कोणतीही गोष्ट न करण्यावरच रणबीरचा भर दिसत आहे. त्यातही आईच्या शब्दाबाहेर जाणाऱ्यांपैकी तो नाही, ज्यामुळे या जोडीनं यंदाच्या वर्षी घाईग़डबडीत लग्नबंधनात अडकण्यापेक्षा पुढच्या वर्षाच्या मुहूर्तालाच प्राधान्य दिलं आहे.