मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवरील दमदार कमाईनंतर आता सलमान खान कोणता चित्रपट घेऊन येणार याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.  


'रेस 3'चं शूटिंग सुरू  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या ईददिवशी सलमान खानचा 'रेस 3' हा बहुप्रतिक्षित चित्रपट येणर आहे. मात्र या चित्रपटाइतकेच त्याच्या चाहत्यांना 'भारत' या चित्रपटाबाबतही उत्सुकता आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित आणि सलमान खान अभिनित 'टायगर जिंदा है' या चित्रपटाने देशा-परदेशात बॉक्सऑफिसवर दमदार कमाई केली. नवनवे विक्रम रचले. मात्र आता या गोष्टीचं दडपण आता दिग्दर्शक अली अब्बास जफर आले आहे. लवकरच सलमान आणि अली अब्बास जफर 'भारत' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. 


हॅट्रिक होणार का? 


अली अब्बास जफर आणि सलमान खान या जोडीने यापूर्वी 'सुल्तान' त्यानंतर 'टायगर जिंदा है' हे दोन सुपरहीट सिनेमे दिले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी 'भारत' चित्रपटामध्येही ही जादू चालणार का ? अशी भीती अब्बासच्या मनात आहे. प्रेक्षकांच्या या जोडीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. 


कोरियन चित्रपटावरआधारित पटकथा 


'भारत' हा आगामी चित्रपट 2014 साली आलेल्या 'ओड टू माय फादर' या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट अली अब्बास जफरच्या यापूर्वीच्या दोन्ही चित्रपटापेक्षा वेगळा आहे. याबाबत काहीही बोलणं आत्ताच्या घडीला खूपच लवकर असेल असे त्याने म्हटले आहे.