Rishabh Shetty on Rashmika Mandanna :  दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) हा गेल्या अनेक दिवसांपासून 'कंतारा' (Kantara Movie) या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक सुरु आहे. कांतारानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेपॉर्डही ब्रेक केले आहेत. 16 कोटी खर्च करून बनवलेल्या या चित्रपटानं आतापर्यंत 400 कोटींचे वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. (Kantara World Wide Collection) कांतारा फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कमाईचे काही विक्रम मोडल्यानंतर, ऋषभ शेट्टी ज्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची इच्छा बाळगतो त्या अभिनेत्रीबद्दल बोलण्यासाठी तो चर्चेत आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभनं नुकतंच 'कांतारा'च्या बॉक्स ऑफिसवरील यशाबद्दल बोलताना त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल खुलासा केला. दरम्यान, त्यानं दाक्षिणेतील दोन अभिनेत्रींबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीत, ऋषभला भविष्यात ज्या अभिनेत्रींसोबत काम करायची इच्छा आहे त्याबद्दल विचारण्यात आलं. यावेळी ऋषभ शेट्टीला विचारण्यात आलं की समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prbhu), रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna), कीर्ती सुरेश (Keerthy Suresh) आणि साई पल्लवी (Sai Pallavi) यापैकी कोणत्या अभिनेत्रीसोबत त्याला पुढील प्रोजेक्टमध्ये काम करायला आवडेल.


ऋषभ शेट्टीला करायचं नाही रश्मिकासोबत काम? 


या प्रश्नाच्या उत्तरात ऋषभ म्हणाला, 'मला त्या आवडत नाही. ऋषभ शेट्टीने गुलटे डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी माझी स्क्रिप्ट पूर्ण केल्यानंतर कलाकार ठरवतो. मी नवीन कलाकारांना काम करण्यास प्राधान्य देतो कारण त्यांना कोणत्याही अडचणी नसतात.' प्रश्नात विचारलेल्या कोणत्याही अभिनेत्रीचे नाव न घेता ऋषभ म्हणाला, 'मला त्या आवडत नाहीत पण मला साई पल्लवी आणि समंथा यांचं काम आवडतं. त्या सध्या सगळ्यात चांगलं काम करत आहेत. 


हेही वाचा : Vikram Gokhale Health News : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून मोठी Update


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून रश्मिका सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. रश्मिकानं कांतारा चित्रपट पाहिला नाही म्हणून ती कोठून आली हे विसरली असं अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 'कंतारा' मध्ये संस्कृती आणि श्रद्धा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. चित्रपटाचा क्लायमेक्स अप्रतिम आहे आणि तो प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. देशातील अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांनी हे चित्रपटात अनुभवल्याचं सांगितलं आहे.