मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह (Amrita Singh) 16 वर्षांपूर्वी घटस्फोट घेऊन वेगळे झाले आहेत. या दोघांनी 1991 मध्ये लग्न केलं आणि 2004 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर तब्बल 16 वर्षांनी सैफने त्याच्या मनातील सल पहिल्यांदा बोलून दाखवली आहे. नुकतंच सैफने मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दलचं दुःख बोलून दाखवलं आहे. या मुलाखतीत सैफ भावूक झाला असून त्यांने ही जगातील सर्वात वाईट गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैफने ही गोष्ट पिंकविला वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. सैफने अमृतासोबतच्या घटस्फोटावर म्हटलं आहे की,'ही जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. जे काही घडलं त्यापेक्षा काहीतरी वेगळं व्हायला हवं होतं. मला वाटतं नाही या गोष्टीचा ताण कधी कमी होईल. काही गोष्टी आपल्याला शांतता देत नाहीत त्यातीलच ही एक गोष्ट आहे.'


पुढे सैफ म्हणाला की,'मी तेव्हा फक्त 20 वर्षांचा होतो. आज गोष्टी खूप बदलल्या आहेत. आपण कायमच विचार करतो की, आई-बाबा दोघे कायम एकत्र राहतील. पण ती दोन्ही वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत. आज आपण मॉर्डन रिलेशनशिपबद्दल बोलतो. कोणत्याही मुलाला आपल्या घरातील उबदार वातावरणापासून वंचित ठेवायला हवं.'


पुढे मुलाखतीत सैफला इब्राहिम आणि साराबद्दल विचारण्यात आलं तेव्हा सैफ म्हणाला की,'कोणत्याही मुलाला त्याच्या घरापासून, कुटुंबापासून असं सहज दूर करता कामा नये. या सगळयांचा मुलांवर खूप वाईट परिणाम झाला. अनेकदा परिस्थिती वेगळी असते. पालक एकत्र नसल्यावर अनेक गोष्टी समोर येतात. अशावेळी एक स्टेबल घर आणि वातावरण मुलांना मिळणं खूप गरजेचं आहे.'