Maharashtra HSC Result 2019 : आज बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सैराटफेम आर्ची देखील बारावीची परीक्षा पास झाली आहे. आर्ची अर्थात रिंकू राजगुरूला बारावीत ८२ टक्के मिळाले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर ही आर्चीच्या निकालाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. शूटिंगमुळे आर्चीला दहावीत नियमितपणे शाळेत जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिने बाहेरूनच दहावीची परीक्षा दिली होती. याआधी रिंकू राजगुरुने डॉक्टर व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा निकाल हा ९०.२५ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यात कोकणातला निकाल सर्वाधिक म्हणजे ९३.२३ इतका लागला असून सर्वात कमी निकाल हा नागपूरचा ८२.५१ टक्के इतका लागला. तसंच यंदा गेल्यावर्षींच्या तुलनेत एकुण निकालात २.५३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.


ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com