Salman Khan : अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोराचे (Malaika Arora) रिलेशन कोणापासूनही लपलेले नाहीत. हे दोघे अनेकदा डिनर आणि पार्टीज करताना दिसतात. मात्र त्या दोघांनी अजूनही आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये वाढणारी जवळीक पाहून बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) यांच्या नात्यावरून खूप नाराज झाला आहे. एवढेच नाही त्याने अर्जुन आणि त्याचे वडील बोनी कपूर यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाने पहिलं लग्न अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा भाऊ अरबाज खान याच्यासोबत केलं. मलायका आणि अरबाज यांची ओळख एका फोटोशूट दरम्यान झाली होती. असं सांगितलं जातं. पहिल्या ओळखीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 19991 मध्ये लग्न केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. अरबाज आणि मलायका यांच्या मुलाचं नाव अरहान आहे. अरहान सध्या परदेशात शिक्षण पूर्ण करत आहे. मात्र अरबाज आणि मलायका यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघे विभक्त झाले. अरबाज आणि मलायका यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर देखील मलायका तुफान चर्चेत आली. 


वाचा: आलिया भट्टच्या लेकीचा Photo Viral; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... 


दरम्यान अर्जुनचे हे वागणे बघून सलमान त्याच्यावर नाराज झाला होता. नंतर अर्जुनने सलमानला मानवले होते. पण आता अरबाज-मलायकाचा घटस्फोट झाल्यानंतरही अर्जुन मलायकासोबत दिसत आहे. आता मात्र सलमान पहिल्यापेक्षा जास्त नाराज झाला आहे. त्यानंतर सलमान खानने अर्जुन आणि त्याचे वडील बोनी कपूर यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. डेक्कन क्रोनिकलने सोर्सेसनुसार लिहिले आहे की, सलमानने बोनी आणि अर्जुन यांच्या आपल्या घरात येण्यावर बॅन लावला आहे.  


सलमानचे इव्हेंटच्या टीमला कडक सूचना


या संपूर्ण घटनेमुळे सलमान खान अर्जुन कपूरवर चांगलाच संतापला असल्याचे बोलले जात आहे. सलमान खानला एका अवॉर्ड फंक्शनला पोहोचायचं होतं असं म्हटलं जातं. मात्र, इथे पोहोचण्यापूर्वी अभिनेत्याने पुरस्कार सोहळा पाहणाऱ्या इव्हेंट टीमला काही कडक सूचना दिल्या होत्या. या अवॉर्ड फंक्शनमध्ये अर्जुन कपूरचा स्टेजवर कोणताही परफॉर्मन्स नसावा, असे सलमान खानने इव्हेंट मॅनेजमेंट टीमला सांगितले होते. अर्थ स्पष्ट होता की एकतर अर्जुनने त्याच्या जाण्यापूर्वी परफॉर्म करावे किंवा सलमान गेल्यानंतर परफॉर्म करावे.