हैदराबाद : दाक्षिणात्य कलाविश्वासोबत हिंदी चित्रपट वर्तुळातही सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांच्यामध्ये आलेल्या दुराव्याची. मागील बऱ्याच काळापासून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. समंथा आणि नाग चैतन्य सध्या विभक्त राहत असून, येत्या काळात ते घटस्फोटाबाबत अधिकृत माहिती देती असंही सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकिकडे नात्यामध्ये आलेल्या दुराव्याच्या या चर्चा पाहायला मिळत असतानाच दुसरीकडे समंथानं थेट तिरुपती तिरुमला या देवस्थळाला भेट दिली. यावेळी तिच्याभोवती माध्यमांचा गराडा पाहायला मिळाला. 


माध्यमांनी समंथाला गाठत तिला मंदिरत परिसरात घटस्फोटासंबंधीचा प्रश्न विचारला. मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर समंथानं परतीचा रस्ता धरला. त्याचवेळी तिला गाठत नाग चैतन्यसोबतचा दुरावा आणि नात्याचं बिनसलेलं समीकरण यासंबंधीचा प्रश्न करण्यात आला. 



हा प्रश्न ऐकताच, 'मी इथं देवदर्शनासाठी मंदिरात आले आहे. (असा प्रश्न विचारायला) तुम्हाला डोकं आहे का?' अशा शब्दांत तिनं समोरच्या व्यक्तीला फटकारलं. सोशल मीडियावर समंथाचं हे रागीट रुप पाहता पाहता व्हायरल झालं. थोडक्यात जाहीरपणे सध्यातरी किमान समंथाय या विषयावर बोलू इच्छित नाही हेच स्पष्ट होत आहे.