Sayali Sanjeev : 'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. आज सायली ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायलीचे नाव हे चैन्नई सुपर किंग्जचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडशी जोडले जात होते. त्यावर सायलीने एका वृत्तपत्रात मुलाखतीदरम्यान स्पष्टच भुमिका मांडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायलीने नुकाताच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने ऋतुराज गायकवाडसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर वक्तव्य केले आहे. या मुलाखतीमध्ये सायलीला कुणाशी तरी नाव जोडलं जाणं आणि ट्रोलिंग या गोष्टी टाळणं शक्य होतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सायलीने उत्तर दिले की, अशावेशळी नो कमेंट्स म्हणून आपण ती गोष्ट सोडून देऊ शकतो. मात्र मला या गोष्टींना सामोरं जाणं महत्त्वाचे वाटले. मी पळ काढत नाही. काहीच नसताना नाव जोडलं जातं, याचा वैयक्तिक आयुष्यात नक्कीच त्रास होतो. तुमची चूक नसताना या गोष्टींना तोंड द्यावे लागत. अफवांना किती प्राधान्य द्यायचं हे स्वत: शी ठरवलं, की गोष्टी सोप्या होतात. आपण उगाच ट्रोल करतोय, हे ट्रोलर्सना कळावं, एवढीच इच्छा अशी प्रतिक्रीया सायली संजीवने दिली आहे.


वाचा :  सुशांत सिंहच्या कुटुंबियांवर पुन्हा दु:खाचा डोंगर, सुशांतनंतर तीन वर्षांनी 'तो' ही गेला सोडून 


काय आहे प्रकरण?


सायली संजवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला होता. या फोटोवर ऋतुराजने कमेंट केली होती. त्यावेळी आयपीएल सुरु होती. सायलीने हार्ट इमोजींचा वापर करत त्याला रिप्लाय दिला होता. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते.